Header Ads

टंचाईग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती न झालेल्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन

टंचाईग्रस्त भागातील दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती न झालेल्या विद्यार्थ्यांनी संपर्क साधवा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ चे आवाहन

मुंबई, दि. 1 : सन 2017-18, 2018-19 मधील खरीप हंगामातील/दुष्काळग्रस्त भागातील इ.10वी  व इ. 12 वीच्या परीक्षा शुल्कमाफीस पात्र तथापि अद्याप परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती झालेली नाही, अशा विद्यार्थ्यांनी स्वत:च्या/पालकांच्या आधार संलग्न बँक खात्याच्या माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत करण्यात आले आहे.

सन 2019-20 मधील अवेळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील इ.10 ची व इ. 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या कार्यवाहीसाठी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित करण्यात आले आहे. तरी संबंधितांनी माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा.

याबाबतची तपशीलवार माहिती मंडळाच्या http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर इ.10 वीसाठी ‘http://feerefund.mh-ssc.ac.in व इ.12 वी साठी ‘http://feerefund.mh-hsc.ac.in या लिंकवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

No comments

Powered by Blogger.