Header Ads

पी.एम.किसान सन्मान योजना ई - केवायसी वाशीम राज्यात अव्वल pm kisan samman nidhi yojana e-kyc Washim District First in Maharashtra

pm kisan samman nidhi yojana e-kyc : Washim District First in Maharashtra, ,पी.एम.किसान सन्मान योजना ई - केवायसी : वाशीम राज्यात अव्वल

पी.एम.किसान सन्मान योजना ई - केवायसी

वाशीम राज्यात अव्वल

pm kisan samman nidhi yojana e-kyc 

Washim District First in Maharashtra

    वाशिम दि.८ (जिमाका) - प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने (pm kisan samman nidhi yojana) च्या पुढील हप्त्यांच्या लाभापासून जिल्ह्यातील पात्र शेतकरी वंचित राहू नये,यासाठी ई - केवायसी (e-kyc) करण्याच्या जिल्हाधिकारी षण्मुगराजन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार ३५१ शेतकऱ्यांनी ई - केवायसी प्रक्रिया ८ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली आहे.आता केवळ २५ हजार २४ शेतकऱ्यांची ई -केवायसी करणे बाकी आहे. पी. एम.किसान सन्मान निधी योजनेत ई - केवायसी (pm kisan samman nidhi yojana e-kyc) करण्याच्या प्रक्रियेत वाशिम जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर (Washim district first in maharashtra) आहे. दुसऱ्या क्रमांकावर भंडारा व तिसऱ्या क्रमांकावर नाशिक जिल्हा आहे. 

         देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून घेतला. १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना संपूर्ण देशभर लागू केली आहे. दर चार महिन्यांनी या योजनेचा २ हजार रुपयांचा हप्ता योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येतो. मात्र केंद्र शासनाने या योजनेबाबत निर्णय घेऊन यापुढील हप्त्यांचा संबंधित शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी ई - केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक केले आहे. 

       जिल्ह्यातील या योजनेसाठी पात्र असलेल्या १ लाख ८९ हजार ३७५ लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई - केवायसी पूर्ण करणे आवश्यक केले आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार ३५१ शेतकऱ्यांनी ई - केवायसी पूर्ण केली आहे.१८ ऑगस्टपर्यंत ७० हजार ८६७ शेतकरी ई - केवायसी करण्यापासून दूर होते. त्यानंतर ई -केवायसीबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार ३५१ शेतकऱ्यांनी ई - केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. आज ८ सप्टेंबरपर्यंत केवळ २५ हजार २४ शेतकरी ई - केवायसी करण्यापासून दूर आहे.प्रलंबित शेतकऱ्यांनी ई -केवायसी करावी यासाठी गावपातळीवर शेतकरी मित्र, सामाजिक कार्यकर्ते, प्रगतिशील शेतकरी यांच्या माध्यमातून ई - केवायसी करण्यापासून प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्या घरापर्यंत पोहोचून त्यांचे आधारकार्ड व संबंधित शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक घेऊन सीएससी केंद्रावर जाण्यास संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले.मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव मंडळाच्या लाऊडस्पीकरच्या व दवंडीच्या माध्यमातून ई -केवायसी करण्याबाबतची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.त्यामुळेच वाशिम जिल्हा पीएम किसान सन्मान निधी योजनेत ई - केवायसी करण्यात राज्यात अव्वल ठरला आहे.

No comments

Powered by Blogger.