पीएम किसान सन्मान निधी योजना PM Kisan Samman Nidhi Yojana Online
पीएम किसान सन्मान निधी योजना
आज ई-केवायसी मुदतीचा शेवटचा दिवस
PM Kisan Samman Nidhi Yojana Online
Last day of KYC
शेतकऱ्यांनी ई-केवायसी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
वाशिम, दि. 30 (जिमाका) : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने (PM Kisan Samman Nidhi Yojana) अंतर्गत जिल्हयात १ लक्ष ८९ हजार ३४४ लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टल (Portal) वर ई-केवायसी (E KYC) पूर्ण करणे आवश्यक आहे. अद्यापपर्यंत जिल्ह्यातील ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्या लाभार्थी शेतकऱ्यांनी आज 31 ऑगस्ट (last day of kyc 31 August) या ई-केवायसी करण्याच्या शेवटच्या दिवशी ई-केवायसी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.
जिल्हयात प्रलंबित असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपूर्वी कोणत्याही परिस्थीतीत ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करण्याचे शासनाचे निर्देश आहे. जे लाभार्थी शेतकरी ई-केवायसी प्रक्रीया पुर्ण करणार नाही, त्यांना ऑगस्ट 2022 आणि त्यानंतरच्या या योजनेच्या हप्त्याचे अनुदान मिळणार नाही. त्यामुळे जिल्हयातील या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या 64 हजार ६82 लाभार्थी शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट 2022 रोजी ई-केवायसी प्रक्रीया पुर्ण करावी. जेणेकरुन त्यांना पुढील हप्त्याचा लाभ देणे सोयीचे होणार आहे.
ई-केवायसी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कॉमन सर्विस सेंटर (CSC) / आपले सरकार सेवा केंद्र (Aple Sarkar) यांच्याकडे आधारकार्ड व आधारकार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक (Aadhar card linked Mobile) घेऊन जाणे आवश्यक आहे. ज्या लाभार्थ्यांचा आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक नसेल, त्यांनी आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी) यांच्याकडे आधारकार्ड आणि उपलब्ध असलेला दुसरा मोबाईल क्रमांक घेऊन जाणे आवश्यक आहे. याशिवाय स्वतः लाभार्थ्याला कोणत्याही ॲन्ड्रॉईड मोबाईलवरूनही आधार ई-केवायसी करता येण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शेतकऱ्याला स्वतः ई-केवायसी करता येईल, ई-केवायसी स्वत: लाभार्थ्यास पुढीलप्रमाणे OTP मोड- पीएम किसान पोर्टल (PM Kisan Portal) वर अथवा मोबाईल ॲपवर करता येईल. यासाठी http://pmkisan.gov.in हे संकेतस्थळ टाकावे. Farmer Corner ला जाऊन e-KYC वर Click करावे. त्यानंतर आधार क्रमांक टाकावा. आधार रजिस्टर मोबाईल क्रमांक भरावा. नंतर Get OTP बटणावर Click करावे. मोबाईलवर प्राप्त झालेला चार अंकी OTP टाकावा. Submit OTP चे बटण दाबावे. त्यानंतर Get Aadhar OTP या बटणावर Click करावे. मोबाईलवर प्राप्त झालेला सहा अंकी OTP Aadhar Registered mobile OTP या रकान्यात टाकावा. त्यानंतर Submit हे बटण दाबावे. हिरव्या रंगात e-KYC यशस्वीपणे पूर्ण झाल्याचा संदेश आपणास मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल.
जिल्हयातील ज्या लाभार्थी शेतकऱ्यांचे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने (PM Kisan Samman Nidhi Yojana) अंतर्गत ई-केवायसी (e KYC) करणे बाकी आहे, त्यांनी आज 31 ऑगस्ट रोजी कोणत्याही परिस्थीतीत या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही प्रक्रीया पुर्ण करणे आवश्क आहे. आता ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही. त्यामुळे ही प्रक्रीया पुर्ण केल्याशिवाय शेतकऱ्यांना माहे ऑगस्ट 2022 नंतरचे या योजनेचे अनुदान हप्ते मिळणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी कॉमन सर्विस सेंटर (सीएससी)/ आपले सरकार सेवा केंद्र याठिकाणी जाऊन किंवा स्वतः लाभार्थ्याला कोणत्याही ॲन्ड्रॉईड मोबाईलवरूनही आधार ई-केवायसी करता येईल. तरी आपल्या आधारकार्डची ई-केवायसी प्रक्रीया आज 31 ऑगस्ट रोजीच पुर्ण करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.
Post a Comment