Header Ads

कारंजात शांतता व सुव्यवस्था कायम, कोणत्याही भुलथापांना नागरिकांनी बळी पडू नये - ठाणेदार आधारसिंग सोनवणे यांचे कारंजेकरांना आवाहन Appeal by Karanja PI Adharsingh Sonone

 


कारंजात शांतता व सुव्यवस्था कायम, कोणत्याही भुलथापांना नागरिकांनी बळी पडू नये

ठाणेदार आधारसिंग सोनवणे यांचे कारंजेकरांना आवाहन 

कारंजा (जनता परिषद) दि.. १३ - कारंजा येथील वातावरण हे शांत असून कायदा व सुव्यवस्था कायम आहे नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता आपली दैनंदीन कामे व व्यवहार सुरळीपपणे पार पाडावीत तसेच समस्त दुकाने व प्रतिष्ठाणे सुरु ठेवावीत असे आवाहन कारंजाचे शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार आधारसिंग सोनवणे यांनी केले आहे. 

त्रिपूरा येथील घटनेचे निषेधार्थ काल शहरात बंद पुकारण्यात आला होता. यावेळी काही दुकानांवर काही समाजकंटकांनी दगडफेक करीत तोडफोड केली. याबाबत कारंजा शहर पोलिसांनी गुन्हे नोंदविले असून दोषी समाजकंटकांना अटक करुन त्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल असे आश्‍वासन ठाणेदार सोनवणे यांनी नागरिकांना केलेल्या आवाहनात दिले आहे. 

No comments

Powered by Blogger.