Header Ads

इयत्ता १ ली पासून चे वर्ग उद्या दि.१० फेब्रुवारी पासून ऑफलाईन सुरु करण्याचे आदेश - schools from 1st std will get started from tomorrow 10 feb 2022



इयत्ता १ ली पासून चे वर्ग उद्या दि.१० फेब्रुवारी पासून ऑफलाईन सुरु करण्याचे आदेश

शासनाने दिलेले निर्देशांचे पालन करणे राहील गरजेचे 

वाशिम जिल्हा प्रशासनाने केले आदेश पारीत 

वाशिम (www.jantaparishad.com) दि. ०९ - वाशिम जिल्ह्यात गत काही दिवसांपासून कोरोनाचे कमी होत असलेले प्रमाण पाहता जिल्हा प्रशासनाने उद्या दिनांक १० फेबुवारी पासून इयत्ता १ ली व त्यावरील वर्ग ही ऑफलाईन सुरु करण्यास परवानगी दिली आहे. मात्र यासाठी शासनाने विहित केलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे राहणार आहेत. याबाबत श्री शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण वाशिम यांनी आज खालील प्रमाणे एक आदेश पारीत केले. यापुर्वी १ फेब्रुवारी पासून इयत्ता ९ वी व त्यावरील वर्ग हे ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्यात आले होते.

कोरोना विषाणूचा औमिकॉन प्रकार जगभरात गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात बेगाने पसरणारा प्रकार म्हणून समोर आला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात ओमिक्रीन कोविड-१पने बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. आणि म्हणूनच विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही आपत्कालीन उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.ओमिक्रॉन प्रकाराच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने दिसुन येत आहे.

शासनाने राज्यामध्ये शाळा व महाविदयान सुरु करण्याबाबत निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने या कार्यालयाचे आदेश क्र.कक्ष-३/आ.व्य/क.ली./कावि-९३/२०२२,दि.३१.०१.२०२२ नुसार वाशिम जिल्हयातील इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा तसेच सर्व अकृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित महाविद्यालये, अभिमत विद्यापीटे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे, समूह विद्यापीठे, तंत्रनिकेतने व तत्सम शैक्षणिक संस्थांमधील नियमित वर्ग दिनांक ०१/०२/२०२२ पासुन प्रत्यक्षरित्या सुरु ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

वाशिम जिल्हयात दिनांक ०८/०२/२०२२ रोजी कोविड-१९ विषाणुमुळे बाधीत होणा-या रुग्णांचा पॉझिटीव्हीटी रेट हा ग्रामीण भागात १२.४३% तर शहरी भागात ९.०१% असा असुन जिल्हयाचा एकत्रीत पॉझिटीव्हीटी रेट १०.८०% इतका असुन जिल्हयाचा पॉझिटिव्हीटी रेट पूर्वीच्या तुलनेत कमी झालेला आहे. तर जिल्हयात लसीकरणाच्या पहिल्या डोसची टक्केवारी ८०.४६% व दुस-या डोसची टक्केवारी ५९.३६% इतकी आहे. त्याअनुषंगाने, श्री. शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, वाशिम,  यांनी साधरोग अधिनियम १८९७. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व फौजदारी प्रक्रिया संहिता ...१९७३ चे कलम १४४ नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार जिल्हयातील विद्यार्थ्यांकरीता नियमीतरित्या शाळा ऑफलाईन पध्दतीने सुरु ठेवणे विद्यार्थ्यांच्या हिताचे राहील याआधीच इयत्ता ९ वी पासुन महाविद्यालयासह शाळा सुरु करण्यात आल्या होत्या, त्यासोबतच आता इयत्ता १ ली पासुन दिनांक १०/०२/२०२२ पासुन प्रत्यक्षरित्या सुरु ठेवण्याचे आदेश पारीत केले आहे. 

संबंधित शाळा/महाविद्यालय यांनी प्रत्यक्षरित्या शाळा सुरु करतांना खाली बाबींची दक्षता घ्यावी.

१) वाशिम जिल्हयातील सुरु होणा-या सर्व शाळा/महाविद्यालय यांनी कोविङ-१९ च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निदेश, कामांच्या ठिकाणांबाबतचे अतिरिक्त निदेश, राज्य शासनाने वेळोवळी काढलेली मार्गदर्शक तत्वे किंवा मानक कार्य प्रणाली (एसओपी) निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचना लागू राहतील.

२) ज्या विद्यार्थी/ विद्यार्थीनींनी (वय वर्ष १४ +) कोबिड-१९ ची लस घेतलेली नाही, त्याच्याकरीता शाळा / महाविद्यालय संबंधित संस्थांचे प्रमुख/मुख्याध्यापक यांनी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहिम राबवून लसीकरण प्राधान्याने पुर्ण करुन घ्यावे. तसेच शाळा/महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे देखील लसीकरण प्राधान्याने करुन घ्यावे. 

३) सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी दिनांक १४/०२/२०२२ रोजी पर्यंत RT-PCR चाचणी करणे बंधनकारक राहील.

४) विदयार्थ्यास ताप, सर्दी, खोकला असल्यास शाळेत येण्याबाबतची बंदी घालण्यात यावी.

५) विदयार्थ्यास शाळेमध्ये येण्याबाबत त्यांचे पालकांचे सम्मती पत्र घेणे शाळेला बंधनकारक राहिल. पालकांनी संमती नाकारलेल्या विदयार्थ्यासाठी ऑनलाईन पध्दतीने शैक्षणिक वर्ग सुरु ठेवण्यात यावे.

६) मैदानावरील खेळ, स्नेह-संमेलने, दैनिक परिपाठ यांसारख्या गर्दीच्या कार्यक्रमाच्या आयोजनावर बंदी राहील.

७) विदयार्थ्यांच्या पालकांचे १००% लसीकरण करण्याच्या दृष्टीने पालकांना प्रोत्साहन देयून जनजागृती करण्यात यावी.

८) शाळा/महाविद्यालय परिसरातील गर्दी टाळण्यासाठी पालकांचा शाळेच्या परिसरातील प्रवेश टाळण्यात यावा.

९) कोविड-१९ प्रतिबंधात्मक त्रिसुत्रीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

१०) शाळा/महाविद्यालय परिसरात शालेय कर्मचा-यांसह सर्वांना मास्क वापरण्याची सक्ती करण्यात यावी.

११) विदयार्थ्यांचे नाक, तोंड नियमित मास्क ने झाकलेले असावे. विदयार्थी मास्क ची अदलाबदल करणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

१२) शालेय परिसराची नियमीत स्वच्छता राखण्यात यावी. वेळोवेळी शाळेचे नियमित निजतुकीरण करण्यात यावे. तसेच विदयार्थ्यांना सुन्दा वैयक्तिक स्वच्छतेबाबत जागरुक करण्यात यावे.

१३) विदयार्थ्यांसाठी वेळोवेळी साबणाने हात धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी.

१४) विदयार्थ्यांना सोबत पाणी बॉटल आणण्यासाठी प्रोत्साहीत करावे.

१५) कोविड-१९ चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शाळांमध्ये बायोमॅट्रीक उपस्थितीचा वापर करण्यात येवू नये.

१६) विदयार्थ्यांनी कोणतेही साहित्य जसे की, पुस्तक, पेन, पेन्सोल. पाणी बॉटल शाळेत येतांना सोबत आणावे. त्यांची आपसात अदलाबदल कर नये याबाबत दक्षता घ्यावी.

१७) एका बाकावर शक्यतो एकच विदयार्थी बसेल याची खबरदारी घ्यावी. तसेच दोन बाकांमध्ये सुरक्षीत अंतर राखण्यात यावे.

१८) शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व इतर पर्यवेक्षकीय यंत्रणेने शाळांना नियमीत भेटी देवून, निर्देशित नियमानुसार शाळा सुरु असल्याबाबतची वेळोवेळी खात्री करावी. तसेच त्याबाबतचा अहवाल शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांचेकडे सादर करुन संकलीत करण्यात यावा. 

उक्त आदेशाचा भंग करणा-या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये तसेच आपत्ती व्यवस्थापण कायदा-२००५ मधील कलमानुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व संबंधितावर सदर कलमानुसार कारवाई करण्यात यईल. सदर आदेश फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ चे तरतुदीनुसार लागू करण्यात येत आहेत.






कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.